नागपूर: नागपूरच्या क्रिकेट चाहत्यांसाठी नागपूर मेट्रो ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी धावणार आहे. एअरवी मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालते. महामेट्रोने माहिती दिली की, भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना असल्याने तो रात्री ११:३० वाजेपर्यंत सुरू राहील.
६ फेब्रुवारी (गुरुवार) रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय डे-नाईट क्रिकेट सामना खेळला जाईल. नागपूरकरांना सामना पाहण्यासाठी सर्व मेट्रो स्थानकांपासून ते नवीन विमानतळ आणि खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध असतील. खापरी मेट्रो स्टेशनवरून शेवटची ट्रेन रात्री ११.३० वाजता सुटणार आहे. खापरीहून प्रवासी ऑटोमोटिव्ह स्क्वेअरला जाऊ शकतात किंवा सीताबर्डी इंटरचेंजवर ट्रेन बदलू शकतात. अॅक्वा लाईनवरून दोन्ही दिशेने प्रवास करू शकतात. दिवसभर मेट्रो गाड्या दर १० मिनिटांच्या अंतराने धावतील.
जामठा स्टेडियम न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून ७ किमी आणि खापरी मेट्रो स्टेशनपासून ६ किमी अंतरावर आहे. जामठा स्टेडियम आणि परतीसाठी (पेमेंटवर आधारित) नवीन विमानतळ स्थानकावर महानगरपालिकेच्या बसेस उपलब्ध असतील. सामन्यानंतर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना महा मेट्रो सेवा वापरून त्यांच्या घरी पोहोचण्याची सुविधा दिली जाईल. महामेट्रो नागपूरच्या क्रिकेटप्रेमी नागरिकांना रस्त्यांवरील गर्दी टाळण्याचे आणि जलद प्रवासासाठी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन करत आहे.
जामठा मैदान वर्धा रोडवर आहे आणि सामन्याच्या दिवशी तेथे जाण्यासाठी मोठी वाहतूक असते. सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे दुपारपासूनच तिथे जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींची गर्दी जमू लागेल. सामना संपल्यावर, लाखो प्रेक्षक एकाच वेळी स्टेडियम सोडून शहराकडे निघतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.
वाहतूक पोलिसांनी यासाठी योजना आखल्या असल्या तरी, मॅचच्या दिवशी चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होतेच. हे टाळण्यासाठी, मेट्रो हा सर्वोत्तम पर्याय आहे. खापरीपर्यंत मेट्रो सेवा आहे आणि तेथून बसेस स्टेडियम पर्यंत धावतात. मेट्रोमुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊ शकते. त्यामुळे महामेट्रोने क्रिकेट चाहत्यांना खाजगी वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेने शहराच्या विविध भागातून विशेष बसेसची व्यवस्थाही केली आहे. सामन्याच्या दिवशी वर्धा रोडवरील जड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे. भंडारा आणि जबलपूरकडून येणारी आणि वर्धा रोडकडे जाणारी वाहतूक देखील वळवण्यात आली आहे.