Published On : Fri, Jun 2nd, 2017

लाठीहल्ला करुन अशोक मोरे या शेतक-याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी – राधाकृष्ण विखे पाटील

Advertisement

392025-vikhe-patil

मुंबई: शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाच्या आंदोलनावर अमानुष लाठीहल्ला करुन अशोक मोरे या शेतक-याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

सरकारने अधिक वेळ न घालवता तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी, अन्यथा शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कोपरगाव येथील लाठीमाराच्या घटनेवर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, शेतक-यांच्या तीव्र भावनांची आपण सरकारला वारंवार जाणीव करून दिली होती. बळीराजाच्या असंतोषाचा कधीही उद्रेक होऊन ते कधीही रस्त्याव उतरू शकतात, असाही इशारा दिला होता. पण शेतक-यांच्या प्रश्नांविषयी संवेदना नसलेल्या या सरकारने शेतक-यांच्या मागण्यांकडे आणि प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक होवून रस्त्यावर उतरला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात सरकारला मोठे अपयश आले असून, याचाच परिणाम शेतक-याचा बळी जाण्यात झाला आहे. कोपरगाव येथील आंदोलनात सहभागी झालेल्या अशोक शंकर मोरे या शेतक-याचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ग असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतक-यांवर दडपशाही करुन आंदोलन संपविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सरकारने कर्तव्याशी प्रतारणा व सत्तेचा दुरूपयोग करणे आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शेतक-यांबाबत केलेले वक्तव्य आणि त्यानंतर राज्यात घडलेल्या घटना पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीने सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असेही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.

शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, उत्पादीत मालाला हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी मागील दोन वर्षांपासून विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात सरकारला आम्ही धारेवर धरले. कर्जमाफीच्या निर्णयासाठी सभागृहात आणि सभागृहाच्याबाहेर आक्रमक पवित्रा घेवून सरकारला शेतक-यांच्या व्यथा सांगितल्या.

Advertisement

संघर्ष यांत्रेच्या निमित्ताने राज्यातील २७ जिल्ह्यात जावून शेतक-यांच्या भावना जाणून घेतल्या. सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा संताप संघर्ष यात्रेतून समोर आला. यामुळेच राज्यातील शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरला आहे. संघर्ष यात्रेच्या दबावामुळेच सरकारला तूर खरेदीची मुदत वाढवावी लागली याकडे लक्ष वेधून विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले की, सरकारच्या विरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. याची वेळीच दखल घेवून, सरकारने तातडीने कर्जमाफीचा निर्णय करावा. अन्यथा यापेक्षाही शेतक-यांच्या अधिक आक्रमकतेला सरकारला सामोरे जावे लागेल.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

कोंढाली में फार्म हाउस धू-धूकर जला, 40 मिनट में खाक! #NagpurNews #Chandanpardi #FireNews #News

कोंढाली में फार्म हाउस धू-धूकर जला, 40 मिनट में खाक! #NagpurNews #Chandanpardi...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges