नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (आप) मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून पक्षात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे प्रमुख नेते राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या सोबतच अशोक मित्तल, संदीप पाठक आणि स्वाती मालिवाल यांनी देखील आप पक्षाला रामराम ठोकला आहे.
राघव चड्ढा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही भाजपमध्ये विलीन होत आहोत. गेल्या १२ वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले, जे पूर्वीचे नेते घेण्यास टाळत होते. देशाच्या जनतेनेही या नेतृत्वाला एकदा नव्हे, तर तीन वेळा कौल दिला आहे.”
ते पुढे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
या घडामोडीमुळे आप पक्षाला मोठा धक्का बसला असून, राष्ट्रीय राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









