Published On : Sun, Aug 17th, 2025
By Nagpur Today Nagpur News

शेतकऱ्याचा मृत्यू की व्यवस्थेचा? जबाबदार कोण?

बुलडाणा जिल्ह्यातील जलसमाधी आंदोलनाने राज्यकर्त्यांना हादरवले पाहिजे. रस्त्याच्या मागणीसाठी विनोद पवार या शेतकऱ्याने नदीत उडी घेतली आणि तब्बल ३० तासांनी त्याचा मृतदेह मलकापूरजवळील त्रिवेणी संगम येथे सापडला.

पण खरी हकिकत एवढ्यावरच थांबत नाही. प्रश्न अधिक गंभीर आहेत –

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
  • एखाद्या शेतकऱ्याला एवढ्या टोकाच्या पावलावर का जावे लागले?
  • ग्रामस्थांच्या वारंवार मागण्या ऐकूनही महाराष्ट्र सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले?
  • आंदोलन सुरू असताना प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप का केला नाही?
  • ज्यांनी हा प्रकार केवळ तमाशा पाहिल्यासारखा बघितला, व्हिडिओ शूट केला – त्यांच्यावर कायद्याने कारवाई का होत नाही?

रस्ता ही मूलभूत गरज. पण रस्त्यासाठी जीव गमवावा लागतो, ही शोकांतिका आपल्याला लाजवणारी आहे. जबाबदार कोण? केवळ नदी की राज्यकर्त्यांची बेफिकिरी?

आज जर सरकारने या घटनेला केवळ आणखी एक “शेतकरी आत्महत्या” म्हणून नोंदवले, तर समाजातील विश्वास उरलेला राहणार नाही. या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.

विनोद पवार यांचा मृत्यू हा फक्त एका शेतकऱ्याचा बळी नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाची थडगी आहे.

हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ येथे पाहा – नदीत उडी घेण्याच्या क्षणांपूर्वी पवार गावकऱ्यांच्या व्यथा आणि रस्त्याच्या मागणीची वेदना व्यक्त करताना ऐकू येतात.

 

Advertisement
Advertisement