Published On : Fri, Apr 25th, 2025
By Nagpur Today Nagpur News

अंबाझरी तलाव प्रकरण;विवेकानंद स्मारकाबाबत उच्चस्तरीय समितीकडून निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Advertisement

नागपूर – अंबाझरी तलावावर उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाबाबतचा अंतिम निर्णय आता उच्चस्तरीय समिती घेणार आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अंबाझरी तलाव प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, स्मारक हटवायचे की नाही, याचा निर्णय समितीने घ्यावा. तसेच, स्मारक हटवले जाणार नसेल, तर तो निर्णय का घेतला जात आहे, याचे स्पष्टीकरण न्यायालयाला द्यावे, असेही सांगण्यात आले.

या सुनावणीदरम्यान विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. न्यायालयाच्या सूचनेनुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी स्मारकाबाबत माहिती सादर केली. मुख्य चर्चा स्मारक तलावाच्या ओव्हरफ्लो पॉइंटवर असल्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी आणि पर्यावरणीय परिणाम यावर केंद्रित होती.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

न्यायालयाने सांगितले की, तलावाचे नैसर्गिक प्रवाह आणि पर्यावरणीय संतुलन कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असून, यासाठीच हा निर्णय उच्चस्तरीय समितीकडे सोपवण्यात येत आहे. या समितीत तज्ज्ञ, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित क्षेत्रातील जाणकारांचा समावेश असणार आहे.

न्यायालयाच्या पुढील सुनावणीपूर्वी समितीने आपला निर्णय सादर करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. अंबाझरी तलाव संरक्षणासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Advertisement
Advertisement