
नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सार्वजनिक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. माजी गृहमंत्र्यांसोबत असे प्रकार घडू शकतात, तर सामान्य माणूस किती सुरक्षित आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला.
माध्यमांना संबोधित करताना ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर टीका केली. तसेच निवडणूक आयोगाने या घटनेची चौकशी करण्याची विनंती केली. अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि भूल दिल्याने ते कोणाशीही बोलत नाहीत. हा महाराष्ट्र आहे. आपण कुठे चाललो आहोत? येथे मतदार सुरक्षित आहेत का? असा सवालही ठाकरे यांनी केली.
20 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी काटोल-जलालखेडा रोडवर ही घटना घडली. देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून त्यात ते जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी नागपूरच्या ॲलेक्सिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
अनिल देशमुख यांचा मुलगा आणि काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सलील देशमुख यांनी भाजपवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला.यातून पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाची भीती दिसून येते, असेही ते म्हणाले.

 
			

 

 
     
    





 
			 
			
