Published On : Tue, Nov 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

माजी गृहमंत्री सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? विकास ठाकरेंचा संतप्त सवाल

Advertisement

नागपूर: काटोल येथे कथित दगडफेकीच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (एससीपी) नेते अनिल देशमुख गंभीर जखमी झाले. यानंतर राजकीय वातावरण तापले.

नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सार्वजनिक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. माजी गृहमंत्र्यांसोबत असे प्रकार घडू शकतात, तर सामान्य माणूस किती सुरक्षित आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला.

माध्यमांना संबोधित करताना ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर टीका केली. तसेच निवडणूक आयोगाने या घटनेची चौकशी करण्याची विनंती केली. अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि भूल दिल्याने ते कोणाशीही बोलत नाहीत. हा महाराष्ट्र आहे. आपण कुठे चाललो आहोत? येथे मतदार सुरक्षित आहेत का? असा सवालही ठाकरे यांनी केली.

Gold Rate
27 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,60,100/-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 3,43,900 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

20 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी काटोल-जलालखेडा रोडवर ही घटना घडली. देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून त्यात ते जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी नागपूरच्या ॲलेक्सिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

अनिल देशमुख यांचा मुलगा आणि काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सलील देशमुख यांनी भाजपवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला.यातून पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाची भीती दिसून येते, असेही ते म्हणाले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement