Published On : Thu, Oct 17th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भारतीय रेल्वेने बुकिंगचे नियम बदलले; प्रवाशांना आता चार महिने आधी करावे लागणार नाही तिकीट बुक!

Advertisement

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. रेल्वेच्या ताज्या अधिसूचनेनुसार, आता प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी 120 दिवस म्हणजे चार महिने वाट पाहावी लागणार नाही. नवीन नियमानुसार, आता प्रवासी प्रवासाच्या फक्त ६० दिवस आधी IRCTC ट्रेनचे तिकीट बुक करू शकतील. भारतीय रेल्वेचा हा नवा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे.

अधिसूचनेत असे म्हटले आहे की आगाऊ रेल्वे तिकीट बुकिंगसाठी नवीन नियमांचा आधीच बुक केलेल्या तिकिटांवर कोणताही परिणाम होणार नाही. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 120 दिवसांच्या ARP अंतर्गत केलेले सर्व बुकिंग कायम राहतील.

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काही दिवस धावणाऱ्या ताजसारख्या एक्स्प्रेस गाड्यांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही रेल्वेने म्हटले आहे. ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस इत्यादींमध्ये आगाऊ आरक्षणाची वेळ आधीच कमी आहे.

परदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांच्या मर्यादेतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement