Published On : Sat, Aug 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रातही वक्फचा घोटाळा झाला म्हणूनच…;देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Advertisement

पुणे: संसदेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले.मात्र वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी विरोध करत संसदेत गोंधळ घातला.पुण्यात पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातही वक्फचा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्रात मागच्या काळात वक्फचा घोटाळा झाला.

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वक्फच्या जमिनी या कोणी लाटल्या आणि त्यात काँग्रेसचे कोणते नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे आणि त्याचा अहवाल देखील समोर आला आहे. यांना वक्फशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त जमिनीशी देणेघेणे आहे.

त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे. जे विधेयक आले आहे त्यामुळे पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे जमिनी लाटणाऱ्या लोकांवर टाच पडणार होती,म्हणूनच त्यांनी त्याचा विरोध केला,असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement