Published On : Fri, Oct 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतील राम प्राणप्रतिष्ठा दिनाला उपस्थित न राहण्यास सांगितले जात आहे का?

Advertisement

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे.येत्या 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुढील वर्षी 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित न राहण्यास सांगण्यात आले आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

ज्या दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक होईल, त्या दिवशी मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासारख्या प्रोटोकॉल असलेल्या व्यक्तीने येऊ नये. असा सल्ला ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिला आहे. ट्रस्टचे सचिव चंपत राय म्हणाले की, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि देशांचे राजदूत यांसारख्या घटनात्मक प्रोटोकॉलचे पालन करणाऱ्या लोकांनी 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी अयोध्येत येऊ नये, जेणेकरून राम मंदिराच्या सोहळ्यादरम्यान कोणाचीही गैरसोय होऊ नये.आम्ही 22 जानेवारीला त्यांची सेवा करू शकणार नाही आणि मला वाटते की येथील स्थानिक प्रशासन देखील त्यांची काळजी घेऊ शकणार नाही.त्यामुळे व्हीआयपींनी या सोहळ्याला उपस्थित राहू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Gold Rate
29 May 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver/Kg 98,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रत्येक राज्यातील लोक 26 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेतील. राममंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि पुढील वर्षी 22 जानेवारीला उद्घाटन समारंभ होणार आहे. जानेवारी 2025 पर्यंत मंदिर तीन टप्प्यात पूर्ण होईल.

अयोध्या राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, मंदिर 12 तास खुले असल्यास 70,000-75,000 लोकांना सहज दर्शन घेता येईल. मंदिराच्या तळमजल्यावर 160 खांब आहेत आणि प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या स्वरूपातील 25 मूर्ती आहेत.

यापूर्वी, ट्रस्टने माहिती दिली होती की त्यांनी 5 फेब्रुवारी 2020 ते 31 मार्च 2023 दरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीवर 900 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि अजूनही 3,000 कोटी बँक खात्यांमध्ये आहेत.

मंदिर ट्रस्टने देशभरातील लोकांना अभिषेक सोहळ्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर त्यांच्या घरासमोर दिवे लावण्याचे आवाहन केले. तसेच रामजन्मभूमीवर देवाला अर्पण केलेला पवित्र धान्य तांदूळ (अक्षता) देशभरातील 5,00,000 गावांमध्ये अभिषेक सोहळ्यापूर्वी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement