नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांसाठी ९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाची शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने घेतला. तसेच राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आणलेले महत्त्वाचे निर्णय-
१. राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)
२. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)
३. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार (कौशल्य विकास )
४. मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी (महसूल विभाग)
५. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
६. केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास)
७. सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे (सहकार विभाग )
८. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन (विधी व न्याय विभाग )
९. मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)
क्राइम ब्रांच यूनिट-4 की कार्रवाई, तीन आरोपी गिरफ्तार #nagpurnews #crime #accusedarrest #latestnews
मोदी सरकार के दावों पर सवाल.. #maharashtranews #modi #latestnews #vaibhavnaik #sindhudurg
कार का शीशा तोड़ने वाला चोर गिरफ्त्तार.. #nagpurnews #crime #accused #latestnews
नितिन तिवारी का शिवसेना में प्रवेश.. #nagpurnews #politicsnews #shivsena #nitintiwari
एफडीए टीम की अफवाह, बाजार बंद ...#latestnews #news #maharashtranews #vidarbha
एसटी कर्मियों का सरकार के खिलाफ प्रदर्शन.. #maharashtranews #stbusstrike #latestnews








