Published On : Mon, Nov 17th, 2025
By Nagpur Today Nagpur News

सौदीतील भीषण अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू; नियमांमुळे मृतदेह भारतात आणणे अशक्य

Advertisement

नवी दिल्ली : सौदी अरेबियात उमराह यात्रेला गेलेल्या भारतीय प्रवाशांच्या बसचा मोठा अपघात झाला असून यात ४२ भारतीयांचा करुण अंत झाल्याची माहिती मिळत आहे. बसने मक्का ते मदिना मार्गावर प्रवास करत असताना ती एका डिझेल टँकरला जोरदार धडकली. धडकेनंतर भीषण आग लागल्यामुळे बस संपूर्ण जळून खाक झाली. महिलांसह छोट्या मुलांचाही या दुर्घटनेत समावेश आहे.

मृतदेह भारतात आणणे का शक्य नाही? सौदीचा कठोर नियम ठरला अडथळा-
उमराह व हज यात्रेबाबत सौदी अरेबियाने पूर्वीपासून स्पष्ट नियम आखले आहेत.
त्याप्रमाणे—

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धार्मिक यात्रेदरम्यान सौदीच्या कुठल्याही भागात एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू झाल्यास
त्याचा मृतदेह स्वदेशात पाठवण्यास परवानगी दिली जात नाही.
मृत व्यक्तीचा अंत्यविधी सौदी अरेबियातच करण्यात येतो.
प्रत्येक प्रवाशाकडून हज/उमराहपूर्वी एक अधिकृत फॉर्म स्वाक्षरी करून घेतला जातो, ज्यात या नियमाची स्पष्ट माहिती नमूद असते.
त्यामुळे कुटुंबीयांनी हरकती घेतल्या तरीही, कायदेशीरदृष्ट्या मृतदेह भारतात आणणे शक्य होत नाही, कारण यात्रेकरूंनी पूर्वीच यासाठी संमती दिलेली असते.
विमा आणि आर्थिक मदतीबाबत काय?
सौदीचा हज कायदा सांगतो की,

हज/उमराह ही धार्मिक यात्रा असून सौदी सरकारकडून कोणताही विमा किंवा नुकसानभरपाई दिली जात नाही.
जर प्रवाशाने भारतातून खासगी विमा घेतलेला असेल, तर त्या विमा कंपनीमार्फत कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळू शकते.
ही प्रक्रिया पूर्णपणे भारतातील संबंधित संस्था आणि विमा कंपन्यांमार्फतच केली जाते.
अपघाताची भीषणता : महिलांसह ११ मुलांचा मृत्यू-
हैदराबाद आणि तेलंगणातील रहिवासी असलेल्या ४२ भारतीयांमध्ये—

Advertisement

२० महिला
११ मुले
यांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. सर्वजण उमराहची धार्मिक यात्रा पूर्ण करून मक्केतून मदिनाकडे रवाना झाले होते. मार्गात डिझेल टँकरला बसची झालेली धडक आणि त्यानंतर पेटलेल्या आगीने सर्व काही क्षणात उद्ध्वस्त झाले.

कुटुंबीयांमध्ये शोककळा, भारत सरकार संपर्कात-
दुर्घटनेची माहिती मिळताच भारत सरकारने सौदीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बचावकार्य आणि आवश्यक मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.