Published On : Fri, Mar 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अवकाळी पावसाचा फटका; काटोल, सावनेर आणि रामटेकमध्ये ४१.१७ हेक्टर पिकांचे नुकसान

Advertisement

नागपूर : अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर आणि रामटेक तहसीलमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार वारे, वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतात उभ्या तसेच कापणी करून ठेवलेल्या पिकांवर पाणी फिरले आहे.

गुरुवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल होऊन काटोल परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांसाठी तो मोठा संकट ठरला. गहू आणि हरभरा पिकांना याचा मोठा फटका बसला असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Gold Rate
Mar 21 2026 - Time 10.22Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,200 /-
Gold 22 KT ₹ 1,35,000 /-
Silver/Kg ₹ 2,30,800/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार, सावनेर तहसीलमध्ये सुमारे ३६.६३ हेक्टर तर रामटेक तहसीलमध्ये अंदाजे ४.५४ हेक्टर क्षेत्रातील गव्हाचे पीक नुकसानग्रस्त झाले आहे. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी पिके आडवी पडली असून त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

काही शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके शेतातच ठेवली होती. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे ही पिके भिजल्याने नुकसान अधिक वाढले आहे. तसेच काही भागात अजूनही पिके शेतात उभी असल्याने पुढील काही दिवसांत नुकसान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्याचे काम सुरू असून पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीवरून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे केल्याचे स्पष्ट होत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement