Published On : Sat, Dec 22nd, 2018

टोल शिफ्टिंग करीता आमदाराचे सारपंचासह मनसर टोल नाक्यावर साखळी उपोषण

Advertisement

रामटेक: -राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील मनसर येथील टेम्पररी टोल बुथ हटविण्यात यावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अनेक आंदोलने व मोर्चे काढण्यात आली आणि रामटेक परिसरातील तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व वर्गातील जनतेसाठी आणि विशेषतः रामटेक दर्शन व परिसरातील पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा आर्थिक भुरदण्ड या टोलच्या रूपाने भरावा लागत आहे आणि त्याचमुळे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने यासाठी केल्या गेली आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सातत्याने हा मुद्दा जोरदार पणे लावून धरला आणि टोल शिफ्टिंग करीता आज साखळी उपोषणवर बसलेत जोपर्यंत टोल हटणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा ह्यावेळी दिला व त्याप्रकारचे निवेदन देखील टोल चे अधिकारी गण यांना दिले., नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मनसर येथील टेंपररी टोल बुथ हटविण्याबाबत पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सांगितले..

मागील ३ वर्षांपासून मनसर येथील टेंपररी टोल हटविण्याची स्थानिकांच्या मागणीवरून आमदार रेड्डी यांनी गडकरी साहेबांकडे वारंवार पाठपुरावा करणे सुरूच आहे. 1 जानेवारी पासून टोल हटणार असल्याचा निर्णय दिल्लीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रमुख उपस्थितीत बैठकीत झाल्यावरही टोल हटण्याचे चिन्ह दिसत नसल्याने अखेर मनसर येथील टोल नाक्यावर साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे येथील टेंपररी टोल बुथ हटविण्यात येईल, असे या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे रामटेक विधानसभा क्षेत्रातील व नागपूर जिल्ह्यातील लोकांनी साहेबांचे आभार व्यक्त केले आहे.

मनसर येथील टेंपररी टोल बुथ हटविण्याबाबत घेतलेले निर्णय रामटेकवासी विसरणार नाहीत.नगराध्यक्ष दिलीप देशमुख, उपाध्यक्ष प्रभाकर खेडकर,नगरसेवक विवेक तोतडे,प्रवीण मानापुरे,आलोक मानकर नगरसेविका चित्रा धूरई,लता कामळे, वनमाला चौरागडे,परमानंद शेंडे, मूलचंद यादव,आनंद चोपकर,ज्ञानेश्वर ढोक,संजय मुलमुले, नरेंद्र बंधाटे,राकेश मर्जीवे,तसेच टोलपासून संतप्त असलेल्या व सतत आर्थिक भुर्दंड पडणाऱ्या विविध व्यापाऱ्यांनी व व्यावसायिकानी ग्राहकांनी,प्रवाशांनी,नागरिकांनी ,शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने,आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,

यांचे उपस्थितीत 29 ऑक्टोबर 2018 ला संपन्न झालेल्या बैठीकीत या टोल शिफ्टिंग करण्याचे नॅशनल हायवे औथोरिटी ऑफ इंडिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या अधिकारी गण यांना सांगितले की 15 दिवसात तुमची टोल हटविण्या बाबत ची प्रक्रिया पूर्ण करून टोल येथून स्थलांतरीत करा. तरी टोल हटण्याचे चिन्ह न दिसल्याने जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचे लक्षात येताच आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आपल्या 25 सरपंच सह साखळी उपोषणाला बसून आंदोलनाचा पवित्रा अखेर हातात घेतला.

सर्वसामान्य जनतेला टोल पासून मुक्ती मिळविण्यासाठी हा लढा सतत सुरू राहणार असल्याचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सांगितले.ह्या वेळी नगराध्यक्ष दिलीप देशमुख , गजेंद्र चौकसे ,लक्ष्मण मेहर, परमानंद शेंडे,नरेंद्र बंधाटे, विशाल कामदार,हेमराज चोखान्द्रे,संजय मूलमुले, राजेश ठाकरे, प्रभाकर खेडकर, नगरसेवीका कविता मूलमुले, उज्वला धमगाये, वनमाला चौरागडे,शिल्पा रणदिवे, उमेश पटले ,रजत गजभिये,आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 3 वर्षाआधी माईन मध्ये एका कार्यक्रमा प्रसंगी मनसर चा टोल लगेच हटणार असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता खरोखरच होईल का अशी देखील चर्चा ह्याठिकानी सुरू होती.

जनसामान्य नागरिकांना टोलनाका मुळे एवढी परेशानी होत असताना एवढा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे तरी टोल सारख्या ह्या गंभीर प्रश्नावर रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार गप्प का हा यक्ष प्रश्न देखील साखळी उपोषण दरम्यान संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.

ओरिएंटल नागपूर बायपास चे जनरल मॅनेजर प्रशांत बर्गी यांना विचारणा केली असता ..२६ डिसेंबर ला टोल स्थलांतरीत ह्या विषयावर दिल्लीत बैठक होणार असल्याचे सांगितले .भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चे प्रोजेक्ट अधिकारी येवतकर तसेच ओरिएंटल नागपूर बायपास चे जनरल मॅनेजर प्रशांत बर्गी यांनी सांगितले की ह्यासंबंधातील प्रपोजल दिल्ली ला पाठविले असल्याचे ह्यावेळी सांगितले.