Published On : Thu, Apr 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी दीक्षाभूमी ते संविधान चौकपर्यंत काढण्यात आला शांती मार्च

Advertisement

नागपूर: बोधगया येथील महाबोधी विहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी नागपुरात दीक्षाभूमी ते संविधान चौक शांती मार्च काढण्यात आला. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच दीक्षाभूमीला भेट दिली होती. त्यावेळी परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षांनी विनंती केली होती की महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाला सोपविण्यात यावे.

महाबोधी महाविहार हिंदू समुदायाच्या ताब्यात आहे. त्यामुळे ते बौद्ध समुदायाला हस्तांतरित करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. ह्याच मागणीसाठी आज बौद्ध बांधवांनी हातात पंचशील ध्वज घेऊन पवित्र दीक्षाभूमीपासून शांतता मोर्चा काढला. सुमारे चार किलोमीटर लांब असलेली ही रॅली संविधान चौकात पोहोचली. पावसाच्या सरींमुळेही मोर्चा सुरूच राहिला. तिथे पूज्य भिक्खू संघ, विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

Gold Rate
06 June 2025
Gold 24 KT 98,000/-
Gold 22 KT 91,100/-
Silver/Kg 1,06,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना एक निवेदनही सादर करण्यात आले आणि आकाश लामा, भिक्खू संघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच अन्य बौद्ध संघटनांच्या वतीने बोधगयामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन व्यक्त करण्यात आले. हे बोधगया मंदिर अधिनियम – १९४९ रद्द करण्याची आणि महाविहार संपूर्णतः बौद्धांच्या ताब्यात देण्याची लढाई आहे. आता ही चळवळ देश-विदेशात उग्र स्वरूप धारण करत आहे.

भिक्खू संघ आणि समता सैनिक दलाच्या नेतृत्वाखाली शांतता मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौद्ध मंच, समता सैनिक दल, समस्त बुद्ध विहार समिती आणि इतर सर्व बौद्ध संघटनांनी सहभाग घेतला.

Advertisement
Advertisement
Advertisement