Published On : Mon, Jun 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजे: मोहन भागवत

Advertisement

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी स्वयंसेवकांशी संवाद साधताना समाजातील जातीय भेदाभेदावर जोरदार भाष्य केले. “समाजाने आता जातिभेदाचा त्याग करून समरस आणि समावेशक राष्ट्राच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे,” असे ते म्हणाले.

भागवत म्हणाले की, संघाचे कार्य म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे. “व्यक्तीच्या विकासातून कुटुंब, समाज, राष्ट्र आणि अख्ख्या मानवतेप्रती जबाबदारीची भावना निर्माण होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रत्येक कुटुंबाशी संघाचा संपर्क आवश्यक-

संघाच्या शाखा ज्या भागात चालतात, त्या भागातील प्रत्येक कुटुंबाशी संघाचा संपर्क असायला हवा, असे सांगताना त्यांनी स्वयंसेवकांकडून त्यांच्या क्षेत्रातील सेवा कार्यांची माहिती घेतली. “आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेने कार्य करतो. जग हे एक कुटुंब आहे, अशा विचाराने संघाने समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले कार्य विस्तारले आहे,” असे भागवत म्हणाले.

सेवा कार्यांतून सकारात्मक बदल-

सरसंघचालकांनी सांगितले की, संघ कार्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या सहकार्याने देशभरात लाखो सेवा प्रकल्प राबवले जात आहेत, जे समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत. “सध्या संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत आहे आणि ‘पंच परिवर्तन’ या तत्त्वानुसार कार्य करत आहे. संघ समाजाला जागरूक, जबाबदार आणि संवेदनशील बनवण्याचे कार्य करत आहे,” असे ते म्हणाले.

जातीय असमानतेपासून मुक्ती आवश्यक-

मोहन भागवत म्हणाले, आपण असे समाज घडवले पाहिजे जे राष्ट्राप्रती आपली जबाबदारी ओळखेल. पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारली पाहिजे आणि सर्वांना मंदिर, तलाव आणि स्मशान यांसारख्या सार्वजनिक संसाधनांचा समान हक्क असला पाहिजे. हीच खरी सामाजिक समरसता आहे.

या वक्तव्याच्या माध्यमातून मोहन भागवतांनी समाजामध्ये समतेची भावना निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले असून, जातीय रेषा मिटवून एकात्मतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement