Published On : Mon, Mar 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील संचारबंदी हटविल्यानंतर पोलीस आयुक्तांनी महाल परिसरात काढला रूट मार्च!

नागपूर: शहरात 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी संचारबंदी लागू केली होती. काल रविवारपासून संचारबंदी उठविण्यात आली आहे.यानंतर नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी रविवारी महाल परिसरात अधिकाऱ्यांसह रूट मार्च काढला.

यावेळी बोलताना आयुक्त म्हणाले की, शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि हे लक्षात घेता संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस प्रशासन सतत सतर्क आहे. शहराची शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर नागपूर पोलिस आयुक्तांनी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या 11 पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रात कर्फ्यू लागू केला होता. शनिवारी पोलिस प्रशासनाने पाच पोलिस ठाण्यांमधील संचारबंदी उठवली होती. त्याच वेळी, हिंसाचारग्रस्त गणेशपेठ, कोतवाली, तहसील पोलिस स्टेशन परिसरात सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सुमारे चार तासांची सूट देण्यात आली जेणेकरून सामान्य जनता त्यांच्या गरजेच्या वस्तू खरेदी करू शकेल. तथापि, यशोधरा पोलिस ठाण्यात कर्फ्यू लागू करण्यात आला होता. रविवारी, नागपूर पोलिसांनी हिंसाचारग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि सर्व पोलिस स्टेशन परिसरातील संचारबंदी उठवली.

संचारबंदी उठवल्यानंतर, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी महाल परिसरात पोहोचून रूट मार्च काढला. यावेळी आयुक्तांनी दुकानदारांचीही भेट घेतली. आयुक्तांनी सांगितले की, सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे आणि हे लक्षात घेता, कर्फ्यू उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी पुढे सांगितले की, जरी संचारबंदी उठवली असली तरी या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement