Published On : Mon, Feb 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अशोक चव्हाणकडून काँग्रेला मोठा धक्का ;पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा !

Advertisement

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. चव्हाण लवकरच भाजपमध्ये जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सध्या या चर्चांवर अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण आले आहे.

राहुल नार्वेकर यांचा आज वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Gold Rate
06 June 2025
Gold 24 KT 98,000/-
Gold 22 KT 91,100/-
Silver/Kg 1,06,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अशोक चव्हाणांचा मोबाईल नॉट रिचेबल –

अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का-

अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता भाजपमध्ये जाणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मनाला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्षात मोठी दरी निर्माण होईल, असे बोलल्या जात आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement