Published On : Sat, Dec 16th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ट्रकच्या धडकेत कारचा भीषण अपघात ; सहा जणांचा जागीच मृत्यू

Advertisement

नागपूर : शहराजवळच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ताराबोडी परिसरात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा चेंदामेंदा झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व सहा जण हे नागपूरच्या काटोल तालुक्यातील रहिवासी होते.

अजय दशरथ चिखले (वय ४५) ,विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५), सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२), रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८), मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६), वैभव साहेबराव चिखले (वय ३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर जगदीश दत्तुजी ढोणे (वय ४०) हा कोमात आहे.

Gold Rate
Feb 9th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,400 /-
Gold 22 KT ₹ 1,46,400 /-
Silver/Kg ₹ 2,63,000 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार सातही जण लग्नासाठी नागपुरात आले होते. रात्री उशिरा नागपुरात लग्नसोहळा आटोपल्यानंतर नागपूरहून काटोलच्या दिशेने आपल्या घरी जात होते. क्वालिस कार नागपूरहून काटोलच्या दिशेने जात असताना एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. नागपुरात लग्नसमारंभ आटोपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला. तर जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement