Published On : Tue, Aug 22nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रातील जनतेल जोडण्यासाठी एमपीसीसीची ‘लोकसंवाद यात्रा’ ३ सप्टेंबरपासून !

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने (MPCC) जनतेल जोडण्यासाठी ‘लोकसंवाद यात्रा’चे (पीपल कनेक्ट) आयोजन केले आहे. काँग्रेस पक्षाच्या या अभियानाचा उद्देश राज्यभरातील नागरिकांशी थेट संबंध प्रस्थापित करण्याच्या आहे. रविभवन, सिव्हिल लाईन्स येथे मंगळवारी एमपीसीसीचे वरिष्ठ पदाधिकारी, खासदार, आमदार आणि पूर्व महाराष्ट्रातील पक्षाच्या इतर सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीतच ‘लोकसंवाद यात्रा’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीला काँग्रेस नेते सुनील केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे,काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या आठवड्यात दिल्लीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि गांधी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसह MPCC सदस्यांच्या बैठक झाली होती. या बैठकीतच या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

काँग्रेसची ‘लोकसंवाद यात्रा’३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून 12 सप्टेंबरला संपेल.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या विविध भागांतील रॅलीच्या नेतृत्वासाठी विविध राजकीय नेते आणि समन्वयकांची नियुक्ती केली आहे. ते नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील कामांवर देखरेख ठेवणार असून विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

Advertisement
Advertisement